नोबेलचे मानकरी
यान टिनबर्जेन- अर्थशास्त्रातील पहिले १९६९ सालचे नोबेल पारितोषिक प्राप्त अर्थशास्त्रज्ञ.
अर्थशास्त्राचे नोबेल स्मृती पारितोषिक हे १९६९ सालापासून देण्यास सुरुवात झाली. अर्थशास्त्राचे पहिले नोबेल पारितोषिक मिळविण्याचा पहिला मान नेदरलँड्सचे यान टिनबर्जेन या अर्थतज्ञाला मिळाला.यान टिनबर्जेन यांचा जन्म १२ एप्रिल १९०३ रोजी झाला. डेरीक काँर्नेलिस टिनबर्जेन आणि जिनेट वँन इक या पती-पत्नीच्या ५ अपत्यांमध्ये यान टिनबर्जेन हे सगळ्यात ज्येष्ठ आपत्य यांचा लहान भाऊ लहान निको यालाही १९७३ सालचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्यांचा आणखी एक भाऊ ल्यूक हा पक्षीतज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे.यान टिनबर्जेन लेडेन विद्यापीठात गणित आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास करीत होते. १९२९ मध्ये त्यांनी याच विद्यापीठातून पीएच. डी. ची पदवी मिळविली. त्यासाठी त्यांनी मिनिमायझेशन प्रोब्लेम इन फिजिक्स अँन्ड इकोनोमिक्स' हा प्रबंध लिहिला. त्यानंतर इरास्मस् विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले. १९२९ ते १९४५ पर्यंत ते विद्यापीठात होते.'लिग आँफ नेशन' या संघटनेचे ते सल्लागार होते.
१९४५ ते ५५ पर्यंत 'नेदरलँण्डस ब्युरो फाँर इकोनाँमिक्स पाँलिसी अँनालिसिस' याचे ते संचालक होते. याबरोबरच अर्थशास्त्रावरील त्यांचे संशोधन सुरूच होते. गणितीय राशीच्या मदतीने आर्थिक घडामोडीचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे अर्थमिती होय.अशाप्रकारे आर्थिक प्रक्रियांच्या विश्लेषणासाठी गतिमान प्रतिकृतीही त्यांनी तयार केल्या. च्या त्यांच्या या अर्थशास्त्रीय संशोधनाबद्दल १९६९ चे अर्थशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक त्यांना राग्रार अँटोन किटिल फ्रिश यांच्या बरोबर देण्यात आले.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
साहित्यातील १९१३ त्यांचे नोबेल पारितोषिक प्राप्त साहित्यिक रवींद्रनाथ टागोर
प्रसिद्ध भारतीय कवी, तत्त्वज्ञ, विचारवंत आणि देशभक्त म्हणून रवींद्रनाथ टागोरांना सन्मानाने गुरुदेव असे संबोधले जाते. रवींद्रनाथ टागोरांचा जन्म बंगालमध्ये झाला. रवींद्रनाथ टागोर हे त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षापासून कविता करत असत. त्यांचा पहिला कवितासंग्रह वयाच्या सोळाव्या वर्षी 'भानूसिंह' या टोपणनावाने प्रसिद्ध झाला १८७७ मध्ये त्यांनी काही लघुकथा आणि नाटकं लिहिली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिश सरकार विरुद्ध उघड उघड विचार माडंले. बंगाली कलांवर होणाऱ्या त्या काळातील ग्रीक आणि लॅटिन कलांच्या वर्चस्वावर त्यांनी कणखरपणे भूमिका घेऊन त्याला प्रतिकार केला होता. 'चित्रा' ' चैताली'' कल्पना' 'क्षणिका' आणि 'नैवेद्य' इत्यादी काव्यसंग्रह तर 'चित्रांगदा' 'मालिनी' ही नाटकं याशिवाय अनेक लघुकथा लेख यांचा त्यांच्या साहित्यात समावेश आहे. 'गीतांजली' हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून या काव्यसंग्रहा बद्दल त्यांना १९१३ सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले.
हे नोबेल पारितोषिक फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील साहित्याचे पहिले नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले होते. त्यांचे बरेचसे साहित्य इंग्रजी भाषेत असल्यामुळे ते पाश्चात्य देशातही लोकप्रिय झाले. त्यामुळे भारतीय संस्कृतीतील अनेक चांगले विचार व संस्कार पाश्चात्त्या पर्यंत पोहोचले. त्यांची 'गोरा' ही कादंबरी खूप गाजली. 'जन गण मन' हे भारतीय राष्ट्रगीत आणि बांगलादेशाचे 'आमार सोनार बांगला' राष्ट्रगीत अशा दोन देशांच्या राष्ट्र राष्ट्रगीतांची त्यांनी रचना केली आहे. या थोर भारतीय विचारवंत साहित्यिकाला १९१३ सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
सर जोसेफ जॉन थॉम्पसन
भौतिकशास्त्रातील १९०६ चे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ.
मॅंचेस्टरनजीक चँथमहिल येथे ११ डिसेंबर १८५६ रोजी जोसेफचा जन्म झाला. मॅंचेस्टर येथील एका पुस्तकविक्रेत्याच्या घरात जन्म घेतलेल्या या बुद्धिमान मुलाने चौदाव्या वर्षी ओवेन कॉलेजात प्रवेश मिळवला. ओवेन कॉलेजात भौतिकशास्त्रातील प्रायोगिक रसायन शाळा ही विशेष सोय उपलब्ध होती.१८७६ साली त्याने ट्रिनिटी कॉलेजची शिष्यवृत्ती मिळवली. बीएची पदवी घेतली.१८८० साली गणित विषयात त्याने प्रावीण्य संपादन केले. त्यात संशोधनाचा भाग अधिक होता. १८८४ सालच्या रॉयल सोसायटीच्या सदस्यत्व निवडीमुळे थॉम्पसन लोकांच्या नजरेत भरला. कँडनेव्हियन लॅबोरेटरीमध्ये संशोधनासाठी त्याला नियुक्त करण्यात आले. विद्युत शास्त्रातील त्याचे शोध फार महत्त्वाचे ठरले. अनुसंरचनेचे सूक्ष्म अध्ययन करून अनु किरणांचे समत्व शोधून काढून अनेक रेणूंची गुणवत्ता शोधून प्रकाश किरणांचे गुणधर्म व त्यांची कार्यशक्ती यांच्या संशोधनामुळे बरीच इलेक्ट्रॉनिक आयुधे अस्तित्वात येऊ शकली. इलेक्ट्रॉनचे महत्त्व लक्षात येण्यास थॉम्पसनचे हे संशोधन फारच उपयुक्त ठरले. वायूंच्या विद्युतीय संवाहकतेविषयी उच्च गुणवत्तेचे सैद्धांतिक व प्रायोगिक अनुसंधान केल्याबद्दल त्यांना १९०६ चे भौतिकी नोबेल पारितोषिक देण्यात आले.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
विल्हेल्म राँटजेन
भौतिकीतील 1901 चे पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ.
क्ष किरणांचा शोध लावणारे जर्मन शास्त्रज्ञ विल्हेल्म राँटजेन हे भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले शास्त्रज्ञ होय.२७ मार्च १८४५ रोजी लेन्नप (प्रशिया) येथे त्यांचा जन्म झाला.राँटजेन यांचे शिक्षण झुरिच येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर ते वुर्झबर्ग भौतिकशास्त्राचे प्राध्यापक काम करीत होते. स्ट्रॉसबर्ग युनिव्हर्सिटीतही त्यांनी अध्यापनाचे काम केले. हे काम करीत असतानाच संशोधनाकडे त्यांचा अधिक कल होता. त्यासाठी त्यांनी फिजिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. १८९५ मध्ये वायूमधून विद्युत प्रवाह सोडण्याचे ते प्रयोग करीत होते. हा प्रयोग करीत असताना निर्वात काच धक्का बसला. त्यामुळे त्यांची जिज्ञासा वृत्ती अधिकच जागृत झाली. त्यावेळी बेरियन प्लॅन्टिनोसानायडच्या तुकड्यातून प्रकाश बाहेर आला. तेव्हा त्यांनी त्याचा सखोल विचार करून त्याचे तत्व शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नलिकेवर कार्डबोर्डचे आवरण बसवलं व विद्युत प्रवाह सुरू करताच जवळच असलेल्या कागदाची चमक वाढली त्याचं कारण कॅथोड किरण असल्याचं त्यांनी शोधून काढलं. इलेक्ट्रॉन ज्यावेळेला काच नळीवर आढळतात तेव्हा काही अज्ञात किरणांचे उत्सर्जन होते व ते खोलीत पसरतात. रासायनिक बदल होतो व तेच किरण शोषण प्रक्षेपणास कारणीभूत होतात हा किरणोत्सर्गाचा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरला. या शोधावर त्यांनी प्रबंधही लिहिला त्यांनी शोधलेल्या या कार्याला राँटजेन रेडीएशन असे नाव देण्यात आले. त्यांनी शोधलेले हे किरण म्हणजेच क्ष किरण. क्ष किरणांचा शोध मानवी शरीराच्या दृष्टीने वैद्यकीय उपचारासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यांच्या या संपूर्ण मानव जातीला उपकारक ठरणाऱ्या संशोधन कार्याबद्दल १९०१ मध्ये पदार्थविज्ञान शास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
फ्रेदरिक पासी
शांततेचे १९०१ सालचे नोबेल पारितोषिक प्राप्त सामाजिक कार्यकर्ते-
फ्रेदरिक पासी हे एक अर्थशास्त्रज्ञ होते. वीस मे १८२२ रोजी पॅरिस येथे त्यांचा जन्म झाला पासीचे काका हे केंद्रीय मंत्री होते. त्यामुळे घरात समाजकारणाचे वातावरण होते. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पासीने कायद्याचा अभ्यास केला. त्यानंतर स्टेट कौन्सिल मध्ये ते अकाउंटंट पदावर रुजू झाले. त्यानंतर मात्र त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठात प्रवेश घेतला. ही परीक्षा पास झाल्यावर १८५७ पासून ते व्यवसायिक अर्थतज्ज्ञ म्हणून काम करू लागले. विद्यापीठात असताना अर्थशास्त्रावर त्यांनी लिहिलेले निबंध आणिअर्थशास्त्रावर दिलेली व्याख्याने बरीच गाजली ती प्रकाशित सुद्धा झाली.१८७७ मध्ये 'फ्रेंच अकॅडमिक देस सायन्स मॉरल्स एट पाँलिटिक्स' या संस्थेचे ते सभासद झाले. १८८१ साली 'चेम्बर ऑफ डेप्युटीज' ची निवडणूक त्यांनी जिंकली. तेथे बदलणाऱ्या राजकीय प्रवाहांच्या संदर्भात ते वकिली सल्ला देत असत. तसेच कारखान्यातील अपघातांच्या संदर्भात कामगारांच्या प्रश्नांना योग्य सल्ला ते देत असत. सामाजिक कार्यात त्यांना विशेष रस होता. आंतरराष्ट्रीय लवादाचे ते पुरस्करते होते. क्रिमियन युद्धाच्या वेळी त्यांनी सुरू केलेले शांतता विषयक कार्य अखेरपर्यंत सुरू ठेवलेले होते. लीग इंटरनॅशनल द ला पैक्स ही संस्था त्यांनी स्थापन केली. आंतरराष्ट्रीय संसदीय संघ स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. पासी हे अर्थशास्त्रज्ञ मुत्सद्दी आणि शांततावादी होते. त्यांनी केलेल्या सकारात्मक समाज कार्यासाठी त्यांना १९०१ चे शांततेचे नोबेल पारितोषिक द्यूनाट यांच्यासोबत विभागून देण्यात आले.
संकलन:-मंजिरी होनकळसे
टंकन:-सुषमा कासार
#ज्ञानभाषामराठी
#माझीशाळामाझीभाषा
No comments:
Post a Comment