Sunday, June 18, 2017

पहिली पावले

कोणत्याही देशाचे लोक परकीय
सत्ता मनोमन स्वीकारत नसतात त्यांच्या मनात असलेल्या सुप्त असंतोषाचा भडका उडण्याचे कारण आपण देऊं नये,या बाबत भारतातील ब्रिटिश सत्ता  अत्यंत जागरूक होती. ख्रिस्ती धर्मप्रसार करण्यास राजसत्तेने उत्तेजन दिल्यास लोकक्षोभ होईल व आपल्या हितसंबंधांना  धोका पोचेल,या भीतीन ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या ताब्यातील क्षेत्रात मिषणार्यांना परवानगी दिली नव्हती .,कलकत्ता जवळ प्रारंभी असलेले आपले मिशन आणि मंद्र
मुद्रणालय  विल्यम कँरेला कंपनीच्या अधिकार  क्षेत्राबाहेर श्रीरामपुरला न्यावे लागले होते,परंतु भारतीयांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारुन आपला उद्धार करवुन घ्यावा, अशी  ब्रिटिश सरकार व ईस्ट इडिया कंपनी दोन्हीमधील  अनेक अधिकार्यांची मनोमन ईच्छा होती.

१८१३मध्ये भारतात राज्यचारभार करण्याची परवानगी देणार्‍या सनदैचे नुतनीकरण करताना, त्यांत ख्रिस्ती धर्मप्रसाराची मुभा देणारे कलम घालण्यात आले व मोठ्या प्रमाणात भारतात मिशनरी आले. मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात आलेल्या  या मिशनर्‍यांनी येथील लोकभाषा आत्मसात केली.हिंदु धर्मातील अनिष्ट रुढींवर टीका करण्यासाठी मराठीत छोट्या पुस्तिका तयार केल्या. बायबल व त्यातल्या गोष्टींची भाषांतरे प्रसिद्ध केली. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा, या दोन माध्यमातुन लोकांकडे जाण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. त्यांनी ग्रजी व मराठी भाषा व इतर विषय शिकवणार्या शाळा काढल्या.

ज्ञानप्रसाराच्या या कार्याबरोबरच आपल्या मुळ उद्देशाला अनुसरुन! ख्रिस्ती धर्मप्रसाराचे मिशनर्यांचे प्रयत्न चालुच होते. त्यांचे हे काम सोपे नव्हते.मिशनर्यांचे विचार किंवा त्यांचे काम यांनाच फक्त विरोध होई असे नाही.प्रसंगी त्यांची वैयक्तीक अवहेलनाहि होई. मात्र त्यांच्या शांतपणे व चिकाटीने चाललेल्या प्रयत्नांची फळे दिसु लागली होती.१९३८ मध्ये धनाजीभाई नवरोजी  व होर्मसजी पेस्तनजी या अननुक्रमे साडेसोळा व एकोणिस वर्ष वयाच्या दोन पारशी तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.पारशी समाजात त्यामुळे मोठी खळबळ उडाली.
दोन पारशी मुलांच्या धर्मांतरामुळे उडालेली खळबळ शांत झाली नसतानाच ,पाच वर्षांच्या अवधीत दुसरे एक धर्मांतर प्रकरण उद्भवले.परळी वैजनाथ तीर्थक्षेत्राचा मुळ रहिवासी असलेला एक ब्राम्हण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईत येऊन राहिला होता.नारायण आणि श्रीपत या दोन मुलांना जनरल असेंब्लीच्या मिशनरी शाळेत त्याने १८३८ व १८४१ मध्ये प्रवेश दिला होता,मोठा मुलगा नारायण यास १८४२ मध्ये त्याच शाळेत शिक्षक म्हणुन नेमण्यात आले होते.त्याने १३सप्टेंबर १८४३रोजी रे. नेस्बिट यांच्याकडुन बाप्तिस्मा घेऊन, ख्रिस्ती धर्म स्वीकारला.मुंबईतील हिंदु समाजात या धर्मांतराची गंभीर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते.

नारायण हा कायद्याच्या दृष्टीने सज्ञान होता.मात्र त्याच्याबरोबर मिशनच्या जागेत राहणारा धाकटा भाऊ श्रीपत याची तेथुन मुक्तता करुन ,त्याचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न करण्याचे पुढारी मंडळींनी ठरविले.
श्रीपत ताब्यात आला,तरी प्रश्न संपले नाहीत.मुलगा बरेच दिवस मिशनर्यांच्या जवळ राहत होता,त्यांच्या हातचे त्याने भक्षिले असणार. त्याच्या हातुन कदाचित अभक्ष्य भक्षण वा अपेयपान घडले असणार! रिकाम्या मंडळींच्या मनात नानाशंका होत्या. या मुलाच्या  शुद्धीकरणासाठी बाळशास्री जांभेकर यांनी पुढाकार घेतला.पुणे,नाशिक आणि मुंबई येथे त्याबद्दल वार झडले. करवीर मठाच्या जगद्गुरुंनी त्याला प्रायश्चित्त देऊन, शुद्ध करुन घ्यावे,असे आज्ञापत्रही पाठविले;परंतु प्रायश्चित्तानंतरही शुद्धी होते,हे काही सनातन्यांना मान्य नव्हते. शुद्धी करुन घेण्यात पुढाकार घेणार्या बाळशास्रींना ग्रामण्याचा~सामाजिक बहिष्काराचा त्रास सहन करावा लागला.

मिशननच्या  शाळांच्या जोडीला सरकारी शाळा निघाल्या व बोर्ड आँफ एज्युकेशन स्थापन झाले,तरी सर्व वर्गासाठी नवी क्रमिक पुस्तके तयार झाली नव्हती.ते काम सुरु होते; परंतु अद्यापही इंग्लंडमध्ये वापरली जाणारी पुस्तके काही प्रमाणांत वापरण्यात येत होती. त्यात ख्रिस्ती धर्माची माहिती देणारे धडेही होते.अशा शिक्षणामुळे धर्मांतराकडे प्रवृत्ती होते,असे वाटुन त्याविरुद्ध १८५७ मध्ये अर्ज झाला. त्यामुळे धार्मिक स्वरुपाचे धडे शिकविण्यात येऊ नयेत,असा आदेश सरकारने काढला.

मिशनरी वृत्तीने ,हिंदु धर्ममंडनाचे काम केले,असे महत्वाचे हिंदु धर्मसमर्थक म्हणजे विष्णु भिकाजी गोखले उर्फ विष्णुबुवा ब्रम्हचारी (१८२५७३) ,वयाच्या तेविसाव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करुन त्यांनी साधना केली. तीन वर्षे पंढरपुरात  व नंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी प्रवचने दिली.जातपात न मानणारे , स्री~पुरुष दोघांनीही ज्ञानसंपादनात सहभागी व्हावे असे मानणारे विष्णुबुवा हे काळाच्या मानाने पुरोगामीच होते.१८५६च्या सुमारास ते द्वारकेस जाण्यासाठी मुंबईस आले.तेथे काही श्रीमंतांच्या  वाड्यात त्यांची प्रवचनेही झाली. परंतु अशा प्रवचनांस अस्पृश्य समजल्या जाणार्यांना हजर राहता येत नसे.त्यामुळे व ख्रिस्ती मिशनर्यांना जाहीर उत्तर द्यावे;म्हणुन १८५७ मध्ये जानेवारी ते जून असे चार साडेचार महिने  मुंबईच्या समुद्रकिनार्यावर त्यांनी मिशनर्यांशी जाहीर वाद केला.विविध धर्माचे लोक या चर्चा व वाद ऐकण्यास येत.वादविवाद शांततेने पार पडत व दुसर्याचे मत शांतपणे ऐकुन घेतले जाई. प्रवचने व वादविवाद या माध्यमाप्रमाणेच विष्णुबुवांनी ग्रंथरचना करुनही,आपले विचार प्रस्तुत केले.

'वेदोक्त धर्मप्रकाश' या आपल्या पुस्तकात त्यांनी वैदिक धर्माची तत्वे,वर्णव्यवस्था,जातिभेद इत्यादींचे विवेचन केले व ख्रिस्ती मिशनर्यांच्या हिंदु धर्मावरील आक्षेपांना उत्तरे दिली आहेत.दोन परस्परविरोधी धर्मस्वरुपांबद्दलचा जाहीर वाद व लोकशिक्षण या संदर्भात विष्णुबुवांचे कार्य वैचारिक संवादाच्या इतिहासात फार महत्वाचे आहे.साम्यवादी तत्वज्ञानाला जवळचे  वाटणार्या कम्युन पद्धतीच्या जीवनाचा पुरस्कार करणारे विचार मांडणारा 'सुखदायक राज्यप्रकरणी निबंध ' हा विष्णुबुवांचा निबंध तर प्रसिद्धच आहे.
काही मोजकीच धर्मांतरै समाजाच्या प्रतिष्ठित वर्गात घडुन आली,ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित होऊ पाहणार्या हिंदु सुशिक्षित तरुणांना धर्मांतराची शैवटची पायरी गाठावी,असे मात्र वाटत नव्हते. म्हणुनच परमहंस सभेचे एक प्रेरक व ख्यातनाम व्याकरणकार दादोबा पांडुरंग आणि महात्मा जोतिबा फुले व त्यांचे वाळवेकरांसारखे मित्र यांना ख्रिस्ती धर्माचे आकर्षण काही काळ वाटले,तरी आपण धर्मांतर करावे, असे वाटले नाही. हिंदू धर्मशोधनाच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात झालेला पहिला संस्थात्मक प्रयत्न म्हणजे परमहंस सभा. दादोबा पांडुरंग सुरत येथे असताना येथील सरकारी शाळेतील एक शिक्षक दुर्गाराम मंछाराम मेहता यांच्या सहकार्याने 'मानव धर्मसभा' या नावाची एक संस्था त्यांनी स्थापली. सभेच्या धर्मविचारांचा ऊहापोह करणारी 'धर्मविवेचन' या नावाची एक पुस्तिकाही  दादोबांनी लिहीली.पुढे दोन वर्षांनी म्हणजे १८४६ मध्ये दादोबा मुंबईस आले.दादोबा नोकरीनिमित्त नेहमी फिरतीवर राहत असल्याने, रामचंद्र बाळकृष्ण जयकर या तरुणास अध्यक्ष करुन,मानव धर्मसभेचे विचार असणारी 'परमहंस सभा' दादोबांनी स्थापली.  (याच जयकरांना महात्मा फुल्यांनी आपला 'शिवाजीचा पोवाडा' अर्पण केला आहे.) या सभेचे कामकाज गुप्तपणे चालावे,असे ठरविण्यांत आले होते.या सलेच्या आद्य सदस्यांत दादोबा पांडुरंग , रामकृष्ण बाळकृष्ण जयकर,भिकोबा दादा चव्हाण,  'मुक्तामाला '  कादंबरीचे लेखक लक्ष्मणशास्री हळबे, 'यमुना पर्यटन' कार बाबा पद्मनजी आणि रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांसारखे लोक होते. परमहंस सभेच्या बैठकीत जातिभेद आपण मानत नाही,हे जाहीर करण्यासाठी ख्रिस्ती बेकरीत तयार झालेला पावाचा तुकडा खाणे आणि परजातीतील माणसांच्या हातचे घोटभर पाणी पिणे आवश्यक करण्यात आले होते. परमहंस सभेने केलेला गुप्ततेचा नियम व उघडपणे आपली मते प्रतिपादन करणे, लोकमत अनुकूल करुन घेण्यासाठी लागणारे मनोधैर्य नसणे या दोन्हीमुळेपरमहंस सभेच्या वतीने फारसे कार्य  होऊ शकले नाही.
याच काळात राजा राममोहन राँय यांच्या विचाराने प्रेरित होऊन , 'ब्राम्हो समाज' नावाची एक संस्था बंगालमध्ये स्थापन झाली होती.ईश्वर एक आहे व इतर कर्मकांडांऐवजी प्रार्थनेसारख्या शुद्धोपासनेने कोणत्याही मध्यस्थीशिवाय   व्यक्तीला ईश्वराकडे जाता येते,असे मानणार्या या पंथाचे पंडित शिवनाथ शास्री व केशवचंद्र सेन यांसारखे पुढारी मुंबईत येत असत.त्यांच्याशी झालेल्या विचारांच्या देवाण~घेवाणीने मुंबईतील मामा परमानंद , डाँ आत्माराम पांडुरंग  आदींना अशीच एखादी संस्था महाराष्ट्रात स्थापन करावी,असे वाटु लागले. डिसेंबर १८६६मध्ये एक प्राथमिक बैठक होऊन,  ३१ मार्च १८६७ रोजी प्रार्थना समाजाची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी नोकरीनिमित्त बाहेरगांवी असलेल्या रामकृष्णपंत भांडारकर,महादेव गोविंद रानडे, वामनराव मोडक हे नंतर  प्रार्थना समाजात सामील झाले.व त्याचे अध्वर्यू झाले .

ब्राम्हो समाज आणि प्रार्थना समाज  यांचे सर्वसाधारण स्वरुप एकच असले , तरी तपशिलाचे मात्र काही फरक होते.मूर्तिपूजा आणि जातिभेद दोघांनाही मान्य नसले , तरी ब्राम्हो समाजाच्या सभासदाला दोन्हीचा निषेध जाहीरपणे करावा लागे. हिंदूंच्या सण आणि समारंभांत प्रार्थना समाजाचे सदस्य सामाजिक दृष्टीने भाग घेत;मात्र त्यांच्या लेखी त्या सणांना धार्मिक महत्व नसे. ब्राम्हो समाजाची व्याप्ती प्रार्थना समाजापेक्षा कितीतरी अधिक होती;परंतु ब्राम्हो समाज हा इतर हिंदू समाजापासून वेगळा पडला. प्रार्थना समाजाचे तसे झाले नाही. उपनिषदे आणि गीता यांच्याबरोबरच अर्वाचीन मराठी साधूसंतांचा उपदेशही प्रार्थना समाज आदरणीय मानत असे.प्रत्यक्ष उपासनेत या संतांच्या__ विशेषतः तुकारामांच्या वचनांचा आधार घेतला जाई.  समाजाच्या 'प्रार्थना मंदिरा' त साप्ताहिक उपासना होई. प्रार्थना ,तद्नंतर  एखाद्या संतवचनावर निरुपण ,असे  मुख्यतः उपासनेचे स्वरुप असे.
आपल्या सार्वजनिक कार्याची पहिली...धर्मशोधनाची प्रेरणा

मूळ लेख - न्या. नरेंद्र चपळगांवकर
टंकलेखन-वृषाली गोखले
संकलन.प्रा.र.न.वनारसे

No comments:

Post a Comment