नामा यशवंत विठोबाचा शरणागत
'संपत्तीच्या बळें एक झाले आंधळे'
श्रीसंपत्ती, वैभवाच्या मृगजळामागे धावत राहून मंडळी मदांध होऊन बसतात.
'वेढिले कळिकाळे स्मरण नाही'- कळिकाळाने आपल्याला सर्व बाजूंनी ग्रासून टाकले आहे,हे त्यांच्या ध्यानीमनी येत नाही.
'विद्यावंत जातीच्या अभिमाने!नेले तमोगुणे रसातळा'
काहींना ज्ञानाचा,विद्याकलेचा तर कुणाला आपल्या जातीचा अभिमान असतो. भक्तभगवंताचे असे नसते.
नामदेवराय लिहितात...
आम्ही विठोबाचे दूत॥यम आणू शरणागत॥
मुखे नाम हातीं टाळी॥महापापा करू होळी॥
करूं हरिनामाचा घोष॥कुंभपाक पाडू ओस॥
करूं हरिकथा कीर्तन॥तोडू यमाचे बंधन॥
एवढा प्रताप नामाचा॥रिघ नव्हे कळिकाळाचा॥
ऐसा नाम यशवंत॥विठोबाचा शरणागत॥
आम्ही श्रीपांडुरंग विठ्ठलाचे दास आहोत,निष्ठावान सेवक आहोत. आम्ही निडर आहोत. साक्षात यमराजालाही शरणांकित करू. मुखाने नित्य हरिनाम आणि हाताने आनंदाची टाळी वाजवितो. त्यायोगे महापापाचा विध्वंस करतो. विनाश करतो. आमचे शस्त्र हरिनामाचे आहे. केवळ त्या नामध्वनीने आम्ही कुंभपाक नरक ओस पाडू,रिकामा करू. हरिकथा कीर्तनाच्या योगाने यमाच्या शृंखला तोडून टाकण्याची आमच्यात ताकद आहे.
नाममंत्राचा प्रभावच इतका जबरदस्त असतो की,त्याच्यापुढे कळिकाळाचा टिकाव लागू शकत नाही.
नामदेवराय सांगतात- मी स्वतः विठ्ठलाला मनोभावे शरण जाऊन यशवंत झालो.सर्वच बाबतीत सुखीसमाधानी होऊन जयवंत होऊ शकलो.
डॉ.अशोक कामत
टंकलेखन:-सौ.मृणाल
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
'संपत्तीच्या बळें एक झाले आंधळे'
श्रीसंपत्ती, वैभवाच्या मृगजळामागे धावत राहून मंडळी मदांध होऊन बसतात.
'वेढिले कळिकाळे स्मरण नाही'- कळिकाळाने आपल्याला सर्व बाजूंनी ग्रासून टाकले आहे,हे त्यांच्या ध्यानीमनी येत नाही.
'विद्यावंत जातीच्या अभिमाने!नेले तमोगुणे रसातळा'
काहींना ज्ञानाचा,विद्याकलेचा तर कुणाला आपल्या जातीचा अभिमान असतो. भक्तभगवंताचे असे नसते.
नामदेवराय लिहितात...
आम्ही विठोबाचे दूत॥यम आणू शरणागत॥
मुखे नाम हातीं टाळी॥महापापा करू होळी॥
करूं हरिनामाचा घोष॥कुंभपाक पाडू ओस॥
करूं हरिकथा कीर्तन॥तोडू यमाचे बंधन॥
एवढा प्रताप नामाचा॥रिघ नव्हे कळिकाळाचा॥
ऐसा नाम यशवंत॥विठोबाचा शरणागत॥
आम्ही श्रीपांडुरंग विठ्ठलाचे दास आहोत,निष्ठावान सेवक आहोत. आम्ही निडर आहोत. साक्षात यमराजालाही शरणांकित करू. मुखाने नित्य हरिनाम आणि हाताने आनंदाची टाळी वाजवितो. त्यायोगे महापापाचा विध्वंस करतो. विनाश करतो. आमचे शस्त्र हरिनामाचे आहे. केवळ त्या नामध्वनीने आम्ही कुंभपाक नरक ओस पाडू,रिकामा करू. हरिकथा कीर्तनाच्या योगाने यमाच्या शृंखला तोडून टाकण्याची आमच्यात ताकद आहे.
नाममंत्राचा प्रभावच इतका जबरदस्त असतो की,त्याच्यापुढे कळिकाळाचा टिकाव लागू शकत नाही.
नामदेवराय सांगतात- मी स्वतः विठ्ठलाला मनोभावे शरण जाऊन यशवंत झालो.सर्वच बाबतीत सुखीसमाधानी होऊन जयवंत होऊ शकलो.
डॉ.अशोक कामत
टंकलेखन:-सौ.मृणाल
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment