*माझा मी विचार केला असे मना,*
*चाळवण नारायणा पुरें तुमचे॥१॥*
*तुम्हांवरी भर घातिलेसे ओझे,*
*हेंचि मी माझे जाणतसें॥२॥*
*वाऊगे बोलावे दिसे फलकट,*
*नाही बळकट वर्म आंगीं॥३॥*
*चोखा म्हणे सुखे बैसेन धारणा,*
*तुमच्या थोरपणा येईल लाज॥४॥*
चोखोबा आणि विठोबा यांच्यामधील हा 'संवाद' तरी कसं म्हणावं? इथे तर केवळ चोखोबाच बोलत आहेत नि विठोबा मात्र मुकाट्याने ऐकत आहे. ते देवाला म्हणतात,"आता मात्र मी आपल्या मनात तुझी भक्ती करण्याचा निर्धार केला आहे माझा उद्धार करण्याचा भार नि जबाबदारी आता तुझ्यावर आहे. आता तुम्हाला याबाबतीत 'चाळवण' (चालढकल) करून चालणार नाही. मला जे करायचे ते मी केले आहे. आता माझ्या जीवनाचे सार्थक करणं तुमच्या हाती आहे. तसं झालं नाही तर मात्र मी धरणं धरीन आणि मग तुमच्या भक्त वत्सलतेला,मोठेपणाला, महात्म्याला उणेपणा येईल. तेव्हा देवा, आता फार अंत न पाहता माझ्या उद्धारासाठी धावून ये."
हा अभंग म्हणजे चोखोबांच्या आर्त भक्तीचा उत्कट उद्गार व आविष्कार आहे. भक्त जेव्हा अशा निर्धाराच्या शिखरावर पोहोचतो त्यावेळी तो त्यापासून मुळीच मागं हटत नाही व त्याच्या दृढनिश्चयापासून कुणीही परावृत्त करू शकत नाही.या अभंगातून आणखी एक अनुषंगिक बाब जाणवते ती अशी की, धरणं धरायची कल्पना यादव काळातही असावी! ती केवळ आजकालची नाही!!
*डॉ. यू.म.पठाण*
*टंकलेखन:-सौ.मृणाल*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*चाळवण नारायणा पुरें तुमचे॥१॥*
*तुम्हांवरी भर घातिलेसे ओझे,*
*हेंचि मी माझे जाणतसें॥२॥*
*वाऊगे बोलावे दिसे फलकट,*
*नाही बळकट वर्म आंगीं॥३॥*
*चोखा म्हणे सुखे बैसेन धारणा,*
*तुमच्या थोरपणा येईल लाज॥४॥*
चोखोबा आणि विठोबा यांच्यामधील हा 'संवाद' तरी कसं म्हणावं? इथे तर केवळ चोखोबाच बोलत आहेत नि विठोबा मात्र मुकाट्याने ऐकत आहे. ते देवाला म्हणतात,"आता मात्र मी आपल्या मनात तुझी भक्ती करण्याचा निर्धार केला आहे माझा उद्धार करण्याचा भार नि जबाबदारी आता तुझ्यावर आहे. आता तुम्हाला याबाबतीत 'चाळवण' (चालढकल) करून चालणार नाही. मला जे करायचे ते मी केले आहे. आता माझ्या जीवनाचे सार्थक करणं तुमच्या हाती आहे. तसं झालं नाही तर मात्र मी धरणं धरीन आणि मग तुमच्या भक्त वत्सलतेला,मोठेपणाला, महात्म्याला उणेपणा येईल. तेव्हा देवा, आता फार अंत न पाहता माझ्या उद्धारासाठी धावून ये."
हा अभंग म्हणजे चोखोबांच्या आर्त भक्तीचा उत्कट उद्गार व आविष्कार आहे. भक्त जेव्हा अशा निर्धाराच्या शिखरावर पोहोचतो त्यावेळी तो त्यापासून मुळीच मागं हटत नाही व त्याच्या दृढनिश्चयापासून कुणीही परावृत्त करू शकत नाही.या अभंगातून आणखी एक अनुषंगिक बाब जाणवते ती अशी की, धरणं धरायची कल्पना यादव काळातही असावी! ती केवळ आजकालची नाही!!
*डॉ. यू.म.पठाण*
*टंकलेखन:-सौ.मृणाल*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
No comments:
Post a Comment